बेळगाव—खानापूर : झुंजवाड (ता. खानापूर) येथील शेतकऱ्याचा विद्युतभारित वाहिनीला हात लागल्याने विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर चांगाप्पा माळवी (वय ३४) असे मृत झालेल्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी बेकवाड येथे घडली आहे.
घटनेची नोंद नंदगड पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत माहिती अशी, सध्या रब्बी हंगाम असल्याने शेतात पिकांना कूपनलिकेद्वारे पाणी देण्यात येते. कूपनलिका चालू झाली म्हणून ज्ञानेश्वर यांनी विद्युत पेटीकडे जाऊन पाहणी केली. त्यावेळी वीज प्रवाह चालूच होता. एका विद्युतभारित वीज वाहिनीला ज्ञानेश्वर यांचा हात लागला. विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Farmer from Jhunjwad (Khanapur) died electrocution after touching an electrified Wire Belgaum